CSR: टाटा कॅपिटलच्या जलआधार कार्यक्रमाने महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये पाणी टिकवण्याचा मार्ग मोकळा केला आहे

टाटा समूहाची प्रमुख वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेडने त्यांच्या CSR उपक्रम – जलआधार कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानच्या ग्रामीण भागात अनेक विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. सूक्ष्म पाणलोट क्षेत्रामधील समुदायांसाठी जास्तीत जास्त पाण्याची सुरक्षितता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.